लॉकडाऊन शिथील होईल असं गृहीत धरू नका – राजेश टोपे

राज्यासह देशात सध्या कोरोनामुळे २१ दिवसांचा लॉक डाऊन घेण्यात आला असून, १४ एप्रिलला देशातील लॉक डाऊन संपत आहे. मात्र देशातील लॉक डाऊन जरी १४ एप्रिलला संपत असला तरी लॉकडाऊन शिथिल होईल असं गृहीत धरू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांन सांगितले आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या बघता. मुंबई पुण्यासारख्या शहरात जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे असेही ते पुढे म्हणाले.

First Published on: April 6, 2020 7:41 PM
Exit mobile version