पवार साहेब ठरवतात ते अंतिम

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मुंबईत लॉकडाऊन लावण्या इतकी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. मात्र, विना मास्क लोकांचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत २० लाख लोकांकडून ४२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिंतेत आहेत. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार का याविषयी विचारणा केली असता, कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार घेतात. त्यामुळे मी याबाबत काहीही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

First Published on: March 15, 2021 8:37 PM
Exit mobile version