गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.