महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईमध्ये गटाध्यक्ष मेळावा पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटाध्यक्षांना कानमंत्र दिला. यासह राज्यामध्ये घडणाऱ्या विविध मुद्द्यांवर वक्तव्य केलंय. यासह मनसे आत्तापर्यंत केलेल्या आंदोलनावर पुस्तिका काढणार असून या सर्व आंदोलनाला कशाप्रकारे वेगळा रंग दिला गेला, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. यातील महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे परप्रांतीयाबद्दलचा आणि यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलंय.