महाविकास आघाडी उभी करण्यासाठी आमचा खारीचा वाटा

निती आयोगाच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनेही एफआरपी दोन ते तीन हप्त्यांत देण्यासंदर्भात अभ्यास गट तयार केला. राज्यातील इतर निर्णय लवकर होत नसताना अभ्यास गट तयार करण्यासाठी इतकी घाई का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. राज्य सरकारची ही भूमिका संशयास्पद आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना अजूनही एकरकमी एफआरपीवर ठाम आहे. एफआरपीसाठी आमची कोणाशी दोन हात करायची तयारी आहे. वेळेप्रसंगी सरकारमधून बाहेर देखील पडू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.

First Published on: April 29, 2021 11:23 AM
Exit mobile version