दूध उत्पादकांना थेट त्यांच्या खात्यावर ५ रूपये अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कंबर कसली आहे. ही मागणी सरकारने पूर्ण केली नाही, तर येत्या १६ जुलैपासून मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.