रावसाहेब दानवे यांची विठ्ठल चरणी पार्थना

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रत्येक आषाढी वारीला पंढरपूरला येत असतात. यंदाही त्यांनी या परंपरेत खंड पडू दिलेला नाहीये. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला आलेल्या त्यांच्या मतदार संघातील वारकऱ्यांशी दानवेंनी भर पावसात चिखल तुडवत जाऊन संवाद साधला आणि त्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे नव्याने राज्यात स्थापन झालेलं शिंदे – फडणवीस सरकार हे त्यांच अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास ही दर्शवला आहे.यावेळी त्यांच्यासोबत सोलापूरचे आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख ही उपस्थित होते.

First Published on: July 10, 2022 12:00 PM
Exit mobile version