राजदंड पळवल्याने सभागृहाचं कामकाज थांबत नाही

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज हे वादळी झाली आहे. विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा अधिवेशन भरवले आहे. यानंतर सभागृहतील कामकाजामध्ये मोठा गोंधळ झाला आहे. विरोधी पक्षातील सदस्य रवी राणा यांनी सभागृह अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जाऊन राजदंड पळवला आहे. यावर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाचं कामकाज सुरुच ठेवत राजदंड पळवला म्हणून सभागृहाचं कामकाज थांबत नाही असा निर्णय झाला असल्याची माहिती दिली आहे.

First Published on: July 6, 2021 3:10 PM
Exit mobile version