कोल्हापुरातील निर्बंध शिथिल केले जाणार नाही

कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा, कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी”, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी माहिती दिली.

First Published on: June 14, 2021 8:47 PM
Exit mobile version