लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी आपापल्या गावाकडे स्थलांतर केले. मात्र आता राज्याने अनलॉकचा निर्णय घेतला असल्याने पुन्हा एकदा कामानिमित्त परप्रांतीय महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या वापसीवर पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.