चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या निर्णयानंतर भाजपकडून विरोध केला जात आहे. परंतु, दारुबंदी उठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीच केली होती. त्यानुसार आता दारुबंदी उठवण्यात आली आहे. मात्र, तरी देखील विरोध का केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.