सहकार क्षेत्रावरुन सदाभाऊ खोतांची टीका…

राज्यातील शेतकरी सध्या विविध समस्यांचा सामना करत आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी नेते माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सहकार क्षेत्राविषयी बोलताना म्हणाले, “यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ, सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यात सहकाराच बारस घातलं आणि शरद पवार साहेबांच्या चेल्यांनी या सहकाराचचं श्राद्ध घातलं”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

First Published on: July 14, 2021 5:10 PM
Exit mobile version