मंत्री संदिपान भूमरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

महाविकास आघाडी सरकार कोसळणार समजताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्री या खासगी निवासस्थानी राहायला गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी घडलेल्या घटनांवरुन मंत्री संदिपान भूमरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोना काळात राजा घरी आणि जनता दारोदारी अशी स्थिती होती. परंतु खूर्ची जाताच उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडताना जसे नवरीने माहेर सोडलं तसं सोंग घेत इव्हेंट केला होता. अशी टीका मंत्री संदिपान भूमरे यांनी केली आहे.

First Published on: September 25, 2022 5:13 PM
Exit mobile version