आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही शरण जाणार नाही तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कोणी आहेत.त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते आजही तसेच फितूर आणि बेईमान दिल्लीला मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालत आहेत.कोणी महाराष्ट्राला कमजोर समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहावा असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.