शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपवर आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. यावर राऊतांनी आक्षेप घेतला आहे. मुलायम सिंह यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. आत त्यांनाच पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला. बाळासाहेबांनी अयोध्या प्रकरणात कडवट भूमिका घेतली. त्यांना पद्मविभूषण का नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.