मोदींच्या नेतृत्वाची कमाल म्हणून भाजपची एकहाती सत्ता आली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेले. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही, असे म्हणत मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात, ते पाहावं लागेल, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.

First Published on: September 17, 2021 1:44 PM
Exit mobile version