पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत बोलताना महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या कामाचे दाखले स्वत: सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले.

First Published on: February 8, 2022 12:57 PM
Exit mobile version