Farm Law: संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

गेल्या दिड वर्षापासून शेतकरी या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत.मात्र सरकारची भूमिका पहिल्यापसूनच आडमुठेपणाची होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं . पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागले असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच पंजाब – यूपीच्या निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने हे कायदे मागे घेतले आहेत असा घणाघात केंद्र सरकारव संजय राऊतांनी केला आहे.

First Published on: November 19, 2021 2:00 PM
Exit mobile version