विधान परिषदेच्या निवडणुकीवरून संजय राऊतांचा विरोधकांना टोला

राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणारी व्यक्ती ही मॅच्युअर्ड असायला हवी. मुख्यमंत्री महाराष्ट्र सांभाळायला समर्थ आहेत. विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याचा आमच्याकडे पन्नास वर्षांचा अनुभव आहे. निवडणूक लढवायची म्हटल्यावर राजकारणात कुणी कुणाला अडवू शकत नाही. सहाव्या जागेसाठी भाजपा इतर पक्षांवर अवलंबून आहे. आणि त्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव आणला जात आहे. कशा प्रकारचा दबाव आणला जातो त्याची माहिती सुद्धा आमच्याकडे रोज येत असते. महाविकास आघाडी सरकार ही निवडणूक लढविण्यासाठी समर्थ आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

First Published on: June 4, 2022 12:02 PM
Exit mobile version