शरद पवारांची बबनराव पाचपुतेंवर जाहीर टीका

१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदा येथील जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला. बबनराव पाचपुते भाषणात म्हणाले होते की, १३ वर्ष मी मंत्री होतो, परंतु मला फक्त सहीचा अधिकार होता. यावर टीका करताना पवार म्हणाले की, मंत्र्यांनी सही केली की आदेश होतो. मंत्र्यांनी सही केली की, कुठल्याही कामाला मंजुरी मिळते. सहीचा अधिकार १३ वर्ष होता आणि तरी काहीच करता आलं नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

First Published on: October 16, 2019 6:28 PM
Exit mobile version