अपरिहार्य कारण असेल तरच घरातून बाहेर पडा

करोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्रसरकार आणि राज्य सरकारने काही निर्णय घेतले आहेत. ते निर्णय गांभीर्याने घ्या आणि मगच कृती करा. राज्यात जमावबंदीचे आदेश असतानाही अनेक ठिकाणी रस्त्यावर लोकं दिसत आहेत. इतर देशातील परिस्थीती गंभीर झाली आहे. त्याची गांभीर्याने नोंद घेऊन वेळीच दक्षता घ्या. असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

First Published on: March 23, 2020 1:29 PM
Exit mobile version