राज्यात भाजपला वगळून सत्ता स्थापनेची सुरुवात करुन दिल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना शरद पवार यांनी भेट दिली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.