राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येत्या ४ महिन्यांमध्ये कोसळेल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. केंद्रातूनच मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांच्या दाव्यानुसार राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची नक्की कारणं कोणती असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.