राष्ट्रवादी पक्षातले नेत्यांपासून ते कार्यकर्ते एकीकडे मोठेच मोठे होत असताना, दुसरीकडे मात्र शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाची मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबतची नाळ तूटत चालली आहे. पक्षाची मंत्रीपदे एकीकडे असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व्यथा एकण्यासाठी मात्र शिवसेना, कॉंग्रेसकडे वेळ नाही अशी कुरबुर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये एकायला मिळत आहे. त्यामुळेच ज्यापद्धतीने देवेंद्र फडणवीस हे काही ठराविक लोकांचे नेते राहिले, तशीच अवस्था ही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून एक आतला आवाज उद्धवजींना वेळीच सावध करण्यासाठी दिला जात आहे.