लॉकडाऊनमध्ये राज्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. टिक टॉकसारखे व्हिडिओ बलात्कार, अॅसिड अटॅक सारख्या कृत्यांना प्रवृत्त करत आहेत. अशा घटनांवर सायबर क्राइम ब्रांच लक्ष ठेवून आहे. तसेच सोशल मीडियावर अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही देशमुख म्हणाले.