सरकारला सुसंवादाने केंद्राकडून मदत मिळेल

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यात लसीकरणाला देखील वेग आलेला आहे. राज्यातील जनतेचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता केवळ दोन दिवसांचाच लसीचा साठा शिल्लक असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारला मदत करणार आहोतच. परंतु, यासाठी सरकारने प्रेमाने आणि सुसंवादाने केंद्राकडून मदत मिळवली पाहिजे. एकीकडे केंद्र सरकारकडे विनंती करता तर दुसरीकडे केंद्र सरकारला झोडून काढता हे योग्य नाही, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

First Published on: April 7, 2021 11:01 AM
Exit mobile version