जनता झोपेत असेल त्यावेळी सरकार बदललेले पाहायला मिळेल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यावर सत्ताधारी भडकले असून त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेत ‘जनता झोपेत असताना आघाडी सरकार निर्णय घेत नाही लोकांच्या समोर निर्णय घेतात’ अशी उपरोधिक टीका केली आहे. तर चंद्रकातदादांचा रात्रीवरच जास्त भरोसा अशी खोचक टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.