कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यातही राज्याला यश आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता लक्षात घेऊन राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारनं जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे. पण, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.