राज्य सरकारने मॉल सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, यासाठी नियमांचे पालन करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, असे असले तरी मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्समध्ये अनेक ग्राहकांची सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे कोणत्या ग्राहकांनी दोन डोस घेतले आहेत, एक डोस घेऊन दोन डोस घेतले असेही सांगितले जाऊ शकते. त्यात नागरिकांकडे फोटो आयडी मागितले तरी ग्राहक संतापतात. त्यामुळे राज्य सरकारचा नियम नियंत्रणाबाहेर असल्याच्या प्रतिक्रिया मॉल व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत.