‘केंद्र सरकारने तब्बल १४ हजार ७७५ कोटीच्या खत अनुदानाच्या ऐतिहासिक निर्णय घेऊन कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने खत सुलभतेने उपलब्ध होईल, याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामासाठी १० हजार रुपये अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली आहे.