सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊतांना टोमणा

संजय राऊत यांच्या म्हणण्यावर आता भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचं ही मन हे चंचल आणि अस्थिर होईल, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. महाराष्ट्राच्या जनतेच नुकसान होऊ नये.महविकास आघाडीने आत्मचिंतन करावं. आपल्याकडे बहुमत आहे की नाही हे त्यांनी विचारपूर्वक समजून घ्यावं. असं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना केलं आहे.

First Published on: June 28, 2022 2:13 PM
Exit mobile version