सोलापूरच्या चिमणी वादावर सुशीलकुमार शिंदेंचा सवाल

सोलापूरच्या विमानसेवेसाठी अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी वादावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. विमानसेवेसाठी ही चिमणी अडथळ्याची ठरत असल्याने पाडण्याची मागणी होत आहे. आतापर्यंत कधी चिमणीचा अडथळा झाला नाही मग आता का? माझ्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी २८ विमाने एकाच दिवशी उतरली तेव्हा चिमणीचा अडथळा जाणवला नाही. मग आता चिमणीचा विषय का गाजतोय, असा सवाल सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

First Published on: December 4, 2022 11:11 AM
Exit mobile version