कळवा येथे दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांची विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. कळव्यातील दुर्दैवी घटनेला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचे दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःची गाडी न चालवता राज्याची गाडी चालवण्याची गरज आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला