वारकऱ्यांच्या आयुष्यातील कष्टाचे निवारण होऊ देत – स्वप्नील जोशी |

आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये पंढरीच्या वाटेवर पायी जाणे म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे, एकदा तरी वारी अनुभवावी. पंढरीच्या वारीला आपण प्रथमच आलो आहे त्याचा खूप आनंद असल्याची भावना आणि आपली आजी पंढरीची वारी करत होती त्याबद्दलच्या आठवणीने अभिनेता स्वप्नील जोशी भावुक झाला.आषाढी यात्रेमध्ये प्रथमच स्वप्नील जोशी पंढरपूरमध्ये दाखल झाले होते, यावेळी त्यांनी वाखरी ते पंढरपूर असा पायी प्रवास केला. तसेच मंदिर परिसरात देखील पाई फिरून वारकरी सांप्रदायिक परंपरेप्रमाणे वारकऱ्यांच्या पायाला चरणस्पर्श करत पंढरीची वारी अनुभवली

First Published on: July 9, 2022 11:04 AM
Exit mobile version