राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीची सध्याची परिस्थिती बिघडत असताना महाराष्ट्र सरकारने आता दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनानुसार पास करण्यावर आम्ही चर्चा करुन निर्णय देऊ, असेही शिक्षणमंत्री म्हणाल्या.