महाविकास आघाडी सरकार आज पडणार, उद्या पडणार, पुढच्या महिन्यात पडणार…. अशी आवई अधुनमधुन उठत राहते. पण खरंच महाविकास आघाडी सरकारला काही धोका आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माय महानगरज्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीदरम्यान मोठे वक्तव्य केले.