कोरोनाबाधित थकबाकीदाराच्या कुटूंबियांना घरातून उचलून नेण्याची भाषा करणार्या मेन्टीफी फायनान्स कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्याला मनसेने चोप दिला आहे. कोरोना काळात गोरगरिबांना थकित देणींसाठी धमक्या देणाऱ्या सर्व कंपन्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी इशारा दिला आहे. पीडित पांचाळ कुटूंबियांची मेन्टीफी फायनान्समध्ये काम करणारा वसुली अधिकारी राज शुक्लाला पाया पडून माफी मागण्यास भाग पाडले.