सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून गांधी शांती यात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ही परिवर्तनाची नांदी आहे आणि महात्मा गांधींजींचे विचार कोणीही कधीच संपवू शकत नाही अशी प्रतिक्रीया काँग्रेसे नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.