कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल ही पाकिस्तानला चपराक असल्याची प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करत आहेत. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. हा भारताचा मोठा विजय आहे. १५- १ मतांच्या फरकाने भारताच्या बाजूने निकाल लागला आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी, असे निर्देश देखील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत.