एकीकडे कोरोनाशी लढा सुरू असताना उद्धव सरकारवरची मुख्यमंत्रीपदाची टांगती तलवार कायम आहे. घटनेच्या आधारावर संविधानात्मक मार्गाचा अवलंब केल्यास उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद जाणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपालांवर घटनेनं काही बंधनं घातली आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचं बंधन म्हणजे मंत्रिमंडळाने केलेली एखादी शिफारस राज्यपालांना पाळावीच लागते. असे अनंत काळसे यांनी स्पष्ट केले.