तिवरे धरण दुर्घटना – मनसेने कांजूरमार्गच्या खड्ड्यांमध्ये सोडले खेकडे

राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तिकडे धरणाच्या बाबतीत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद मुंबईत ही उमटत आहेत. रविवारी कांजूरमार्ग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून खेकडे सोडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खेकडे आंदोलन केलं होतं.

First Published on: July 7, 2019 1:28 PM
Exit mobile version