आषाढी एकादशीच्या निमित्ताने इगतपुरीमध्ये वृक्षारोपण

इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा कावणई किल्ल्यावर कळसुबाई मित्र मंडळाच्या वतीने गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात साधारण ३० ते ४० बाळगोपाळांनी विठ्ठल रखुमाईचा वेश परिधान करून आषाढी एकादशीचा औचित्य साधून उंबर, वड, पिंपळ आणि आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करून जवानांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी कळसुबाई मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: July 1, 2020 4:52 PM
Exit mobile version