दिल्लीतील पोलिसांची कारवाई ‘जालियनवाला बाग’ सारखी

दिल्लीत जामिया विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. दिल्लीत जे काही झालं ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच देशातील युवक बॉम्बसारखा आहे. या बॉम्बची वात पेटवू नका, असे आवाहन देखील ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केले आहे.

First Published on: December 17, 2019 7:33 PM
Exit mobile version