मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सभागृहात भाषण करताना राज्यातील ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच सफाई कामगार, झोपडपट्टी वासीयांना घरं मिळवून देणार असल्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा किंवा आश्वासन देत नाही तर ते पूर्णसुद्धा करते असा टोलासुद्धा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. मुंबईचा विचार नेहमी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असाच केला गेला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.