शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे हे दोन गट तयार झालेत. खरी शिवसेना आम्हीच आहोत हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाने निवडणूक आयोग आणि कोर्टात धाव घेतली. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे टेन्शन अधिक वाढणार आहे. यामागचे कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवडणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे.