भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा जोपर्यंत सांभाळली, तोपर्यंत वेगवेगळ्या कॉन्ट्रॉव्हर्सी निर्माण झाल्यात, आता राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतरही भगतसिंह कोश्यारींने केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी मंजूर करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंनी धमकी दिल्याचा आरोप केलाय. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्यपालांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय.