ठाकरेंसह सुषमा अंधारे, संजय राऊत पिंजून काढणार महाराष्ट्र

शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी विविध अभियानातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत ठाकरे गटाचे नेते, उपनेते आणि युवासेनेचे पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहेत.

First Published on: February 25, 2023 2:26 PM
Exit mobile version