‘भाजपला विकासापेक्षा धार्मिकतेवर मतं हवी होती’

दिल्लीसह आता भाजपला संपूर्ण देशात नाकारलं जाणार आहे. त्याची सुरूवात दिल्लीतून झाली आहे अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दिल्लीत भाजपचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत हा निकाल अपेक्षित होता अशी टीका केली आहे. भाजपने सर्व धार्मिक मुद्दयावर मतं मागितली. त्यामुळे या प्रचाराची दिशा फक्त धार्मिकतेवर होती हे स्पष्ट झालं आणि लोकांनी भाजपला नकारलं अशी टिकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

First Published on: February 11, 2020 3:54 PM
Exit mobile version