मंत्री विजय वडेट्टीवारांची कंगनावर खोचक टीका

अभिनेत्री कंगना रणौतने महात्मा गांधींचा अपमान केला आहे. दुसरा गाल पुढे केल्यावर भीक मिळते स्वातंत्र्य नाही असे वक्तव्य कंगनाने केलं आहे. यावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टीका केली आहे. कंगना नाची असल्याचे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसेच कंगनाचे महात्मा गांधी यांच्याबाबतचे वक्तव्य म्हणजे सूर्याच्या दिशेने थुंकणाऱ्याच्या तोंडावर थुंकीच पडणार असं ते विधान असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

First Published on: November 17, 2021 1:46 PM
Exit mobile version