डिजिटल इंडियाची गावात मिळेना रेंज

मुळात नाशिक जिल्ह्यातील तीन शाळांची निवड करून त्यांना गौरवले गेले होते. यात या मोडाळे शाळेचाही सहभाग होता. शाळेतील विद्यार्थीही अत्यंत शहर आहेत. नेटवर्क समस्येवर मात करण्यासाठी जीवघेनी पायपीट करत हे विद्यार्थी आपली गुणवत्ता टिकवून आहेत, मात्र हतबल प्रशासनासमोर हा प्रश्न योग्यरित्या मांडला जात नसावा म्हणूनच की काय.. अद्यापही नेटवर्कची ही समस्या कित्येक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलत आहे. विशेष बाब म्हणजे, याच शाळेला एका सामाजिक संस्थेकडून चाळीस टॅब आणि एक लॅपटॉप देण्यात येणार आहे. मात्र, नेटवर्कच नसल्याने या आधुनिक सुविधांचे करायचे तरी काय, असा प्रश्न आता खुद्द शिक्षकांनाच पडला आहे.

First Published on: June 25, 2020 6:32 PM
Exit mobile version